*चोरद जलस्तर वाढला, शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली.."चोरद धरण ओव्हरप्लो"...*





 

 ( मंगरूनाथ तालुका  प्रतिनिधि : अनंता घुगे )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

वाशिम / मंगरूनाथ ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ ऑगस्ट गुरुवार:- वाशिम जिल्ह्यातील मंगरूनाथ येथील चोरद धरण ‘ओव्हरफ्लो’ मंगरूनाथ तालुक्यातील चोरद धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. शेतकर्यांसह सर्वांनाच चोरद धरण कधी भरणार, याची उत्सुकता होती. दरम्यान, गेल्या 7 ते 10 दिवसांपासून संततधार सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत होती. अखेर बुधवारी धरण पूर्ण क्षमतेने भरुन दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले, मंगरूनाथ तालुक्यातील चोरद धरणाची आहे. परिसरासाठी हे धरण खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे चोरद धरण कधी भरणार, याकडे शेतकºयांसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून होते.गेल्या सात ते दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत होती.अखेर बुधवारी धरण शंभर टक्के भरुन दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरण भरल्यामुळे शेतकºयांची रब्बीची चिंता मिटली आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.संततधार पावसामुळे नदीनाले तुडुंम भरून वाहत आहे. यामुळे चोरद धरणात अजून जलस्तर वाढता राहण्याची शक्यता आहे. यामुळे जल पातळीत वाढ झाली आहे. शेतातील विहिरी व स्थानिक नागरिकांच्या बोअरवेलच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.मंगरूळनाथ तालुक्यातील   परिसरातील नागरिकांना यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नागरिकांनी आता तरी पाण्याची बचत करावी व भविष्यात पाणी टिकेल याप्रमाणे वापरावे, अशी.गुरा ढोरांचा सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे वरुणराजाने कृपा केली आणी शेतकऱ्यांची चिंता दुर झाली आहे.

Post a Comment

0 Comments